श्यामलीची ही एक साधी,सोपी रचना....मन! लोकगीताच्या अंगाने जाणारी हिची चाल कशी वाटतेय...ऐकून सांगा.
मन!
मन एक सान पक्षी
मन रानभर नक्षी
मन पिसारा पिसारा
मन मोठाच पसारा
मन भीती मन प्रिती
मन भुणभूण किती
मन आठवे साठवे
पुन्हा जुनेच नव्याने
मन कैरीची गं फोड
नाही कसलीच तोड
मन साजण साजण
गाली चढते तोरण
मन माय मन तात
मन सखीचा गं हात
मन जखम जखम
मन घालते फुंकर
मन भास मन त्रास
लक्ख उजेडाची आस
मन चकव्याचे फूल
पुन्हा पुन्हा देई हूल
कवयित्री:श्यामली
चाल ऐका.
मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९
गंध वार्यावर !
नरेंद्र गोळे ह्यांची ही चारोळी वाचली आणि आवडलीही मात्र हिला चाल कशा पद्धतीने लावावी ह्याबद्दल मनात गोंधळ होता. त्यामुळे बरेच दिवस ती बाजूलाच पडून होती. आज अचानक तिच्यासाठी चाल सुचली आणि ती तिच्या अर्थाला अनुकुल आहे असे वाटले म्हणून इथे तुमच्या अभिप्रायार्थ ठेवत आहे. ऐकून सांगा कशी वाटली?
गंध वार्यावर
गंध वार्यावर बूचफुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत ती ||
कवी:नरेंद्र गोळे
चाल इथे ऐका.
गंध वार्यावर
गंध वार्यावर बूचफुलांचा किती |
पाय होती स्थिर, देती ना गती ||
चित्त चालतसे वळणांची वाट ती |
स्वैर धावतसे धुंद आठवांत ती ||
कवी:नरेंद्र गोळे
चाल इथे ऐका.
बुधवार, २६ ऑगस्ट, २००९
निर्माल्यातिल दोन फुले.
पुष्कराजची ही अजून एक सहजसुंदर रचना. ही चाल कशी वाटतेय ते सांगा.
र्निमाल्यातिल दोन फुले
सहज ऐकले बोलत होती
र्निमाल्यातिल दोन फुले
कालच आपण फुललो होतो
कसे विसरले लोक खुळे
जाउ दे रे सोडून दे तू
काय मनाला घेसी लावून
काय आपुले ह्यांचे नाते
जिथे सख्यांची नाही आठवण
सखे- संगती सोडून दे तू
आई-बापही अडचण होती
नीच इतुका झाला माणूस
स्वार्थास्तव रे शिवतो नाती
पाहिलास का वृद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
कवी:पुष्कराज
त्रितालात गायलेली चाल इथे ऐका.
र्निमाल्यातिल दोन फुले
सहज ऐकले बोलत होती
र्निमाल्यातिल दोन फुले
कालच आपण फुललो होतो
कसे विसरले लोक खुळे
जाउ दे रे सोडून दे तू
काय मनाला घेसी लावून
काय आपुले ह्यांचे नाते
जिथे सख्यांची नाही आठवण
सखे- संगती सोडून दे तू
आई-बापही अडचण होती
नीच इतुका झाला माणूस
स्वार्थास्तव रे शिवतो नाती
पाहिलास का वृद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे
कवी:पुष्कराज
त्रितालात गायलेली चाल इथे ऐका.
किलबिल !
श्रीराम पेंडसे हे एक महाजालावरचे बुजुर्ग व्यक्तीमत्व. ते प्रवासवर्णन,कविता आणि योगशिक्षणासंबंधी नियमित लेखन करतात.त्यांनी केलेली एक बालकविता इथे सादर करतोय. चाल कितपत जमलेय ते ऐकून सांगा.
किलबिल
घंटा झाली, शाळा सुटली
वर्गा वर्गाची दारे उघडली
रडके हसरे चेहेरे घेऊन
मुले मुली बाहेर आली ॥१॥
आई धावली मावशी धावली
बाबा काका मागे राहिले
आपल्या ओळखीचे चेहेरे
सर्व चिमुकले शोधू लागले ॥२॥
आज शाळेत काय झालं
आया ताया विचारू लागल्या
सर्व चिमण्या उत्सुकतेने
एक सुरात किलबिलू लागल्या ॥३॥
प्रार्थना शिकवली, गोष्ट शिकवली
आकडे शिकवले अक्षरे शिकवली
नाच झाले, गाणी झाली
खूप खूप खूप खूप धमाल आली ॥४॥
चित्रे काढली, खाऊ खाल्ला
डबा मात्र नाही खाल्ला
नंतर मात्र आम्ही सगळ्यांनी
मस्तपैकी केला कल्ला ॥५॥
कवी: श्रीराम पेंडसे
चाल इथे ऐका.
किलबिल
घंटा झाली, शाळा सुटली
वर्गा वर्गाची दारे उघडली
रडके हसरे चेहेरे घेऊन
मुले मुली बाहेर आली ॥१॥
आई धावली मावशी धावली
बाबा काका मागे राहिले
आपल्या ओळखीचे चेहेरे
सर्व चिमुकले शोधू लागले ॥२॥
आज शाळेत काय झालं
आया ताया विचारू लागल्या
सर्व चिमण्या उत्सुकतेने
एक सुरात किलबिलू लागल्या ॥३॥
प्रार्थना शिकवली, गोष्ट शिकवली
आकडे शिकवले अक्षरे शिकवली
नाच झाले, गाणी झाली
खूप खूप खूप खूप धमाल आली ॥४॥
चित्रे काढली, खाऊ खाल्ला
डबा मात्र नाही खाल्ला
नंतर मात्र आम्ही सगळ्यांनी
मस्तपैकी केला कल्ला ॥५॥
कवी: श्रीराम पेंडसे
चाल इथे ऐका.
मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९
प्रेम - चार ओळीत !
पुष्कराजची ही छोटीशी पण अर्थपूर्ण रचना बरंच काही सांगून जाते. कविता वाचताक्षणीच चाल सुचली. कशी वाटतेय ते ऐकून सांगा.
प्रेम - चार ओळीत
मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे ?
या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे ?
कवी:पुष्कराज
चाल इथे ऐका.
प्रेम - चार ओळीत
मी गेल्यावर स्मरशील का रे?
आठवणींनी व्याकूळ होउन
सांग कधी तू रड्शील का रे ?
या प्रश्नाला काय म्हणावे.
आत्म्याने देहास पुसावे
मी गेल्यावर जगशील का रे ?
कवी:पुष्कराज
चाल इथे ऐका.
सोमवार, २४ ऑगस्ट, २००९
रे घना !
श्यामलीची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचताच चाल लावाविशी वाटली. ह्यातले ’रे घना,सांग ना’ हे शब्द खूप काही सांगून जातात. ऐकून पाहा चाल आवडतेय का ते.
रे घना
अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा
मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?
रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?
ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे
भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...
कवयित्री:श्यामली
रे घना
अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा
मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?
रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?
ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे
भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...
कवयित्री:श्यामली
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...
-
रेमी डिसोजा हे नाव मला तसे नवीन असले तरीही महाजालावर पक्के मुरलेले हे व्यक्तीमत्व दिसतंय. मराठी आणि इंग्रजीमधून ह्यांनी गद्य आणि पद्य लेखन ख...
-
व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा ह...