श्यामलीची ही अजून एक सहजसुंदर रचना. वाचताच चाल लावाविशी वाटली. ह्यातले ’रे घना,सांग ना’ हे शब्द खूप काही सांगून जातात. ऐकून पाहा चाल आवडतेय का ते.
रे घना
अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा
मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?
रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?
ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे
भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...
कवयित्री:श्यामली
रे घना
अंथरून जीव हा वाट पाहते धरा
येथ मेघ येत ना; आर्त साद अंबरा
मार्गही तोच अन नेमही असे जुना
काय येथे तुला यायचे ना पुन्हा?
रे घना सांग ना काय झाले असे?
कोण ते भेटले तुला नवे कधी कसे?
ऐक ना तुझ्याविना सर्व येथे सुने;
पाखरे न बोलती राहती उगा घुमे
भांडणास आपुल्या सोड ना अता जरा
अंथरून जीव हा वाट पाहते धरा...
कवयित्री:श्यामली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा