जयंता५२ म्हणजेच जयंतराव कुलकर्णींची ही अजून एक सशक्त गजल.मूळ गजलेत ६ शेर आहेत पण मी चाल लावण्यासाठी पहिले चारच वापरलेत. ह्या गजलेला लावलेली चाल कशी वाटतेय ते ऐकून पाहा.
ऋतू न्याराच
ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे
म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?
अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे
उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे
निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे
विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?
कवी:जयंता५२
इथे चाल ऐका.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...
-
ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्य...
-
व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा ह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा