नागपुरचे तुषार जोशी हे देखिल एक अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. लेखक/कवी म्हणून त्यांनी भरपूर लेखन केलेय. त्यांची ’गान समाधी’ ही कविता वाचताच लगेच चाल लावाविशी वाटली. आधी मी भैरवीत चाल लावली होती पण का कुणास ठाऊक ह्या कविततेल्या आशयाला ती पूरक वाटली नाही म्हणून मग मी ही दुसरी चाल लावली. ऐकून सांगा कशी वाटतेय ती?
गान समाधी
आलाप असा की नव चैतन्य जागे
तृप्त मनाने गान समाधी लागे
एकेक सूर उजळतो आयुष्याला
आनंद सुरांच्या धावे मागे मागे
मज कुणी नको साथ कराया आता
माझे जगणे तर फक्त सुरांनी भागे
आयुष्याचा रत्न जडित हा शेला
विणतो मी घेऊन सुरांचे धागे
तुषार जोशी, नागपूर
इथे चाल ऐका.
मंगळवार, १२ मे, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
गंगाधर मुट्यांच्या ह्या भारताच्या तिरंगी ध्वजाबद्दलच्या काव्यबद्ध भावना वाचून मलाही उचंबळून आले आणि त्यातच ही चाल सुचली...ऐकून सांगा..कशी ...
-
ऊठ मर्दा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपुढे शहाणपण जेव्हा व्यर्थ जाते माणुसकीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्य...
-
व्यवसायाने ज्योतिषी असणारे धोंडोपंत आपटे हे महाजालावरचे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. कविता,गजल आणि गद्य लेखन ह्या तिन्ही प्रकारात त्यांचा ह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा