बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

ती स्वप्नसुंदरी

गंगाधर मुटे...एक गावाशी आणि मातीशी घट्ट नातं जोडलेला कवीमाणूस. शेतीशी निगडीत अशा ह्या मुटेसाहेबांनी कवितांमध्ये निरनिराळे विषय हाताळलेले आहेत.गजल,हजल,निसर्गकविता, वास्तववादी कविता,गावरान कविता अशा विविध प्रकारे त्यांनी अतिशय सुंदर अशा काव्यरचना केलेल्या आहेत..त्यांची ही एक बहारदार पण तितकीच वास्तववादी कविता पाहा.




सात खिडक्या पुरेशा मी झाकतो तरी
शिरते कशी कळेना ती स्वप्नसुंदरी

जोपासतो अशी ही आम्ही समानता
राधा,टिना,करीना बाजूस श्रीहरी

जोडे सजावटीला एसी-कपाट ते
भाजी-फ़ळास जागा, मात्र उघड्यावरी

मंगळ कह्यात आला, कक्षेत तारका
भैरू अजून खातो कांदा नि भाकरी

जिंकून मीच हरतो, ना जिंकतो कधी
तुमचा लवाद आहे, पंच तुमचे घरी

खेड्याकडून जावे शहराकडे जसे
आकार घटत चोळी, जाते सरासरी

शेती करून मालक होणेच मुर्खता
सन्मान मोल आहे कर अभय चाकरी

कवी: गंगाधर मुटे

चाल इथे ऐका.

शनिवार, २४ जुलै, २०१०

हा तोच किनारा फिरतो मी

राजेश घासकडवी ह्यांची ही तरल भावना व्यक्त करणारी कविता वाचा....कविता वाचता वाचताच तिची चालही अलगदपणे उलगडत गेली. कशी ते ऐका......

उजव्या बाजुस गजबजणारी तीच गाज घुमते अरबी
हा तोच किनारा फिरतो मी ।।धृ।।

दगडावरती झोकुन सारे
वार्‍यामनिचे गुपित खारे
लेउन लाटा उधळण करती तीच तुषारांची धुंदी ।।१।।

तोच दिवस त्या महिन्याचाही
तोच कोन त्या किरणांचाही
परंतु पृथ्वी सूर्याभवती व्यर्थ फेर फिरली काही ।।२।।

धरून ऐना कुंद हवेला
तनामनाने हिरवुन गेला
तसा न सागर आज सांगतो जन्मजन्मीच्या गुजगोष्टी ।।३।।

केसांमधल्या लाटा सारत
शब्दहासरे तुषार बरसत
उजव्या बाजुस गाज रोखुनि चालत तू ना मजसाथी ।।४।।

काय बोललो तेव्हा आपण
कसे कुठे अन गेले ते क्षण
मनात ओल्या रेतीवरच्या त्याच खुणा धरल्या जपुनी ।।५।।

डाव्या बाजुस गाज अता ही
सूर्यास्ताची सरते तरिही
जादू उरली अजुनी अपुल्या स्पर्शधुंदीच्या लाटांची ।।६।।

कवी: राजेश घासकडवी

चाल इथे  ऐका

गुरुवार, २२ जुलै, २०१०

गाणी

क्रान्तिची ही अजून एक आशयघन कविता वाचा...त्यानंतर मला सुचलेली चालही ऐका.

आज अचानक जागी झाली
कधीतरी निजलेली  गाणी
सांजवात होऊन तेवली
मनातली विझलेली गाणी ||

दबले, बुजले, घुसमटलेले
सूर विजेसम  लख्ख चमकले,
घन बरसावे तशी बरसली
कंठातच थिजलेली गाणी ||

भुरभुरता पाऊस कोवळा
संध्यारंगातून  झिरपला,
किरणांच्या छायेत उतरली
थेंबांवर सजलेली गाणी ||

नवथर मातीच्या ओलेत्या
देहाच्या परिमलात घुमली,
दरवळली अन तिच्या कुशीतुन
कोंबांसह रुजलेली गाणी ||

निळेसावळे ओले अंगण,
तुझ्या नि माझ्या मनात श्रावण,
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी ||

असाच अवखळ पाउस होता,
अन उडणारी एकच छत्री,
आठवली का हळूच माझ्या
कानी कुजबुजलेली गाणी?

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.

बुधवार, २१ जुलै, २०१०

अंतरंग

जयपाल ह्यांची ही साधी सोपी अशी रचना वाचून मला जी चाल सुचली ती ऐका.



पावसाच गाणं
मातीच न्हाणं
माझ समुद्र होण
अंतरंगी

ओला पक्षी
हिरवी नक्षी
मी एक साक्षी
अंतरंगी

चींब सर
ओली थरथर
अधिर हे अधर
अंतरंगी

उठे उधाण
नुरे देहभान
मन हे तुफान
अंतरंगी

झाकल्या खुणा
उघड्या पुन्हा
घडे काय गुन्हा?
अंतरंगी

कवी: जयपाल

चाल इथे ऐका

अरूपाचे रूप

आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने क्रान्तिने रचलेल्या ह्या अभंगाला मी चाल लावलेय...ऐकून पाहा आणि आवडली/नावडली तर तेही सांगा.

अरूपाचे रूप | श्रीहरी स्वरूप
पाहता तद्रूप | जीव होई


भक्तांचियासाठी | चंद्रभागेकाठी
उभा जगजेठी | पंढरीत


दीनांचा कैवारी | सावळा मुरारी
संकटात तारी | पांडुरंग


भाव तेथे देव | नांदतो सदैव
कैवल्याची ठेव | अंतरात


मायबाप, भ्राता | तूच सखा, त्राता
रुक्मिणीच्या कांता | दे दर्शन

कवयित्री: क्रान्ति

चाल इथे ऐका.

शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१०

पार इस बारिश के है

तुषारची ही हिंदी कविता...हिलाही चाल लावलेय. बघा आवडतेय का ?

पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
कडकती है बिजली और
धडकाती है मन मेरा
-
चेहरे की मधुरिमा
आईने पार छाई
फूल बालों में सजाया
जिन्दगी महकाई
घाव काजल का लगे
पलकों पे कितना प्यार
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
-
थाम लो अब आह को
ऑंसूओं थम जाओ
ना रे ना रे ना सखी
ऐसे भी मुरझाओ
गीत मनका मुस्कुराए
होठों पर अब मेरा
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा
-
हाथों पर मुसकाए ओले
हरियाली छाए
बुंदों का रोमांच मेरे
हाथों पर उग आए
भीगा भीगा ऑंसमा
हाथों में भर लो सारा
पार इस बारिश के है
सखी तेरा डेरा

तुषार जोशी,नागपूर


चाल इथे ऐका


मुक्त!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अंदमानातील कारावासात तिथल्या भिंतीवर ’कमला’ नावाचे खंडकाव्य लिहिले. ते लिहिण्यासाठी त्यांना कागद-पेन/पेन्सिल मिळाले नाही...म्हणून त्यांनी ते भिंतीवर लिहिले असा इतिहास आहे. ह्या कवितेत लोककवी मनमोहन नातू ह्यांनी त्यामागची कल्पना मांडलेली आहे. ती आपण इथे जास्त विस्तृतपणे वाचू शकाल.
ही कविता वाचली आणि जी चाल सहजपणाने सुचली ती इथे आपल्याला ऐकता येईल.


मी मुक्तांमधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी|
माझे नि तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी ||१||

माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी|
माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी ||२||

जड लंगर तुझिया पायी, तू पीस कसा होणार?
माझ्याहुनि आहे योग्य, भूमीला प्रश्न विचार ||३||

आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही|
मग विनायकाने त्यांची आळवणीही केली नाही ||४||

पापण्यात जळाली लंका, लाह्यांपरी आसू झाले|
उच्चारुन होण्याआधी उच्चाटन शब्दां आले ||५||

की जन्म घेण्यासाठी गंगेस हिमालय नाही|
शाई न वाळली अजुनी परि अभंग नदीच्या बाही ||६||

दगडाची पार्थिव भिंत ती पुढे अकल्पित सरली|
मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली ||७

-- लोककवी मनमोहन नातू.

इथे चाल ऐका.