जयंत कुलकर्णी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जयंत कुलकर्णी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २५ जुलै, २००९

ऋतू न्याराच !

जयंता५२ म्हणजेच जयंतराव कुलकर्णींची ही अजून एक सशक्त गजल.मूळ गजलेत ६ शेर आहेत पण मी चाल लावण्यासाठी पहिले चारच वापरलेत. ह्या गजलेला लावलेली चाल कशी वाटतेय ते ऐकून पाहा.

ऋतू न्याराच

ऋतू न्याराच ह्या नगरात आहे
इथे तर पानगळ बहरात आहे

म्हणे ते सूर साती वर्ज्य ह्याला
कसा हा राग ह्या प्रहरात आहे?

अजूनी धुंद ही झुलतात प्रेते
नशा भलतीच ह्या जहरात आहे

उगा ना मागती ते घास अर्धा
युगांची भूक 'त्या' उदरात आहे

निभावा आजचा हा दिन कसाही
विनवणी हीच ह्या अधरात आहे

विना संचारबंदी सुन्न रस्ते
कुणाचे राज्य ह्या शहरात आहे?

कवी:जयंता५२

इथे चाल ऐका.

मंगळवार, १२ मे, २००९

ती संपली कहाणी !

जयंता५२ ह्या नावाने गजल/कविता लिहीणारे जयंतराव कुलकर्णी हे नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर आपले लेखन करतात.त्यांची ’ती संपली कहाणी’ही गजल वाचली आणि चाल लावण्याची उर्मी आली. अतिशय कमी शब्दात नेमका आशय मांडणारी ही गजल छोट्या बहरमधील असल्यामुळे हिची चाल पारंपारिक गजलेच्या अंगाने जात नाहीये.

ती संपली कहाणी

ती संपली कहाणी
आता नको उजळणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!.


कवी: जयन्ता५२

रूपक तालात गायलेली  चाल इथे ऐका.