मंगळवार, १२ मे, २००९

ती संपली कहाणी !

जयंता५२ ह्या नावाने गजल/कविता लिहीणारे जयंतराव कुलकर्णी हे नियमितपणे मनोगत ह्या संकेतस्थळावर आपले लेखन करतात.त्यांची ’ती संपली कहाणी’ही गजल वाचली आणि चाल लावण्याची उर्मी आली. अतिशय कमी शब्दात नेमका आशय मांडणारी ही गजल छोट्या बहरमधील असल्यामुळे हिची चाल पारंपारिक गजलेच्या अंगाने जात नाहीये.

ती संपली कहाणी

ती संपली कहाणी
आता नको उजळणी

घडले नवे न काही
अन् कारणे पुराणी

माझ्या सवेच झाली
ही आसवे शहाणी

मी शीळ घालतो, ती
का भासते विराणी?

राजा नसेन मी, पण
गोष्टीत तूच राणी!.


कवी: जयन्ता५२

रूपक तालात गायलेली  चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: