बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

निर्माल्यातिल दोन फुले.

पुष्कराजची ही अजून एक सहजसुंदर रचना. ही चाल कशी वाटतेय ते सांगा.

र्निमाल्यातिल दोन फुले

सहज ऐकले बोलत होती
र्निमाल्यातिल दोन फुले
कालच आपण फुललो होतो
कसे विसरले लोक खुळे

जाउ दे रे सोडून दे तू
काय मनाला घेसी लावून
काय आपुले ह्यांचे नाते
जिथे सख्यांची नाही आठवण

सखे- संगती सोडून दे तू
आई-बापही अडचण होती
नीच इतुका झाला माणूस
स्वार्थास्तव रे शिवतो नाती

पाहिलास का वृद्धाश्रम तो
मालवणारे दिवे इथे
प्रकाशवाटा ज्यांनी आखल्या
त्या वाटांचा अंत तिथे

कवी:पुष्कराज

त्रितालात गायलेली  चाल इथे ऐका.

४ टिप्पण्या:

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे म्हणाले...

चाल आणि गायन सुरेख झालं आहे...!!!

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद बिरुटसाहेब.

Abhijit Phadke म्हणाले...

aavadla! chaangla upkram aahe.

प्रमोद देव म्हणाले...

धन्यवाद अभिजीत!