गुरुवार, ९ एप्रिल, २००९

भूल!

बेसन लाडू ह्या टोपण नावाने लिहीणारा चक्रपाणी चिटणीस हा एक उत्तम गजलकार आहे. तो गद्यही तितक्याच समर्थपणे लिहीतो.
’भूल’ ह्या त्याच्या गजलेतच चाल दडलेली होती ती मी फक्त आपल्यासमोर मांडतोय.नेहमीप्रमाणे निवडक शेर घेतलेत चाल ध्वमुसाठी. :)

भूल

पांघरायला विस्मरणांची झूल नको आता!
आठवायला काटे पुष्कळ! फूल नको आता

हवे करीअर, हवे प्रमोशन्, माडी अन् गाडी
हवी 'मजा' प्रणयातसुधा, पण मूल नको आता

मिटक्या मारत गिळून घेताना ओव्हनमधले,
मऊभात, भाकरी ...?... धूर अन् चूल नको आता

लपाछपीचे खेळ पुरेसे झाले, हे मृत्यो,
पुढ्यात ये जर असेल हिंमत! हूल नको आता

गंधित वारा तुझ्या गावचा - पण मी गुदमरतो
(मिणमिणत्या श्वासास तुझी चाहूल नको आता)

सुदैव माझे कुणी पळवले मलाच ना पत्ता,
उरलेलेही लुटायचे तर भूल नको आता!

मिठीत घे रे, कुशीत घे, विठ्ठला जरा आता
नाळ जिण्याशी घट्ट करे तो पूल नको आता

कवी:बेसन लाडू

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: