बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

मन!

राघवची कविता वाचताक्षणीच आवडली आणि सहजपणाने चाल उलगडत गेली. सोईसाठी काही निवडक ओळीच घेतलेत.
ही आहे चाल क्रमांक ९८

मन उगाच धावतं..कशापाठी वेडावतं!
जसं लहानगं मूल प्रतिबिंबास धरतं..

मन उगाच उदास..सदा रुसल्याचा भास!
जशी कोकीळाची साद अन्‌ नुसताच त्रास!!

मन उगाच निस्तब्ध..काळजाचा थरकाप..
जसा स्तब्ध पाण्यावर, उठे तरंग..अश्राप!

मन उगाच तत्वज्ञ, करी अनंत विचार..
जशी अळवाच्या पानी मोतियाची थरथर!

मन उगाच अल्लड..दोन अश्रुंची झिम्मड!
जशी पावसाची सर..अलगद..अलवार..

मनं जुळून येतात..हातांमधे दोन हात..
जशी रात्र दिवसाची उलगडते पहाट!!

कवी: राघव

चाल इथे ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: