रविवार, २८ जून, २००९

मौन तुझे!

क्रान्तिची ही अजून एक सहजसुंदर आणि हळूवार कविता. त्याची चालही त्यातच दडली होती.


मौन तुझे

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज गातसे
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणातही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

कवयित्री:क्रान्ति

इथे चाल ऐका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: